॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अथ श्रीमद् भगवद्गीता ॥
। अथ प्रथमो अध्यायः - अध्याय पहिला ।
। अर्जुनविषादयोगः ।
ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥
देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २ ॥
हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।
जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥ ३ ॥
स्मृति तेचि अवयव । देखा आंगीक भाव ।
तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥ ४ ॥
अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें ।
पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्नांचीं ॥ ५ ॥
पदबंध नागर । तेंचि रंगाथिले अंबर ।
जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ॥ ६ ॥
देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥ ७ ॥
नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी ।
दिसती उचित पदें माझारीं । रत्नें भलीं ॥ ८ ॥
तेथ व्यासादिकांच्या मतीं । तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥ ९ ॥
देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेची भुजांची आकृति ।
म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हातीं ॥ १० ॥
तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।
वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ॥ ११ ॥
एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडितु ।
तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥ १२ ॥
मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥ १३ ॥
देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।
जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥ १४ ॥
तरी संवादु तोचि दशनु । जो समता शुभ्रवर्णु ।
देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥ १५ ॥
मज अवगमलिया दोनी । मिमांसा श्रवणस्थानीं ।
बोधमदामृत मुनी । अली सेविती ॥ १६ ॥
प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।
सरिसेपणें एकवटत इभ- । मस्तकावरी ॥ १७ ॥
उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदे ।
तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ॥ १८ ॥
अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥ १९ ॥
हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ।
तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥ २० ॥
आतां अभिनव वाग्विलासिनी ।
ते चातुर्यार्थकलाकामिनी ।
ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥ २१ ॥
मज हृदयीं सद्गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु ।
म्हणौनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी ॥ २२ ॥
जैसें डोळ्यां अंजन भेटे ।
ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।
मग वास पाहिजे तेथ । प्रगटे महानिधी ॥ २३ ॥
कां चिंतामणी जालियां हातीं ।
सदा विजयवृत्ति मनोरथीं ।
तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति ।
ज्ञानदेवो म्हणे ॥ २४ ॥
म्हणोनि जाणतेनें गुरु भजिजे ।
तेणें कृतकार्य होईजे ।
जैसें मुळसिंचनें सहजें ।
शाखापल्लव संतोषती ॥ २५ ॥
कां तीर्थें जियें त्रिभुवनीं ।
तियें घडती समुद्रावगाहनीं ।
ना तरी अमृतरसास्वादनीं ।
रस सकळ ॥ २६ ॥
तैसा पुढतपुढती तोचि ।
मियां अभिवंदिला श्रीगुरुचि ।
जो अभिलषित मनोरुचि ।
पुरविता तो ॥ २७ ॥
आतां अवधारा कथा गहन ।
जे सकळां कौतुकां जन्मस्थान ।
कीं अभिनव उद्यान ।
विवेकतरूचें ॥ २८ ॥
ना तरी सर्व सुखाचि आदि ।
जे प्रमेयमहानिधि ।
नाना नवरससुधाब्धि ।
परिपुर्ण हे ॥ २९ ॥
कीं परमधाम प्रकट ।
सर्व विद्यांचे मूळपीठ ।
शास्त्रजाता वसौट ।
अशेषांचें ॥ ३० ॥
ना तरी सकळ धर्मांचें माहेर ।
सज्जनांचे जिव्हार ।
लावण्यरत्न भांडार ।
शारदेचें ॥ ३१ ॥
नाना कथारूपें भारती ।
प्रकटली असे त्रिजगतीं ।
आविष्करोनि महामतीं ।
व्यासाचिये ॥ ३२ ॥
म्हणौनि हा काव्यांरावो ।
ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।
एथूनि रसां झाला आवो ।
रसाळपणाचा ॥ ३३ ॥
तेवींचि आइका आणिक एक ।
एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।
आणि महाबोधीं कोंवळीक ।
दुणावली ॥ ३४ ॥
एथ चातुर्य शहाणें झालें ।
प्रमेय रुचीस आलें ।
आणि सौभाग्य पोखलें ।
सुखाचें एथ ॥ ३५॥
माधुर्यीं मधुरता ।
श्रुंगारीं सुरेखता ।
रूढपण उचितां ।
दिसे भलें ॥ ३६ ॥
एथ कळाविदपण कळा ।
पुण्यासि प्रतापु आगळा ।
म्हणौनि जनमेजयाचे अवलीळा ।
दोष हरले ॥ ३७ ॥
आणि पाहतां नावेक ।
रंगीं सुरंगतेची आगळीक ।
गुणां सगुणपणाचें बिक ।
बहुवस एथ ॥ ३८ ॥
भानुचेनि तेजें धवळलें ।
जैसे त्रैलोक्य दिसे उजळिलें ।
तैसें व्यासमति कवळिलें ।
मिरवे विश्व ॥ ३९ ॥
कां सुक्षेत्रीं बीज घातलें ।
तें आपुलियापरी विस्तारलें ।
तैसें भारतीं सुरवाडलें ।
अर्थजात ॥ ४० ॥
ना तरी नगरांतरीं वसिजे ।
तरी नागराचि होईजे ।
तैसें व्यासोक्तितेजें ।
धवळत सकळ ॥ ४१ ॥
कीं प्रथमवयसाकाळीं ।
लावण्याची नव्हाळी ।
प्रगटे जैसी आगळी ।
अंगनाअंगीं ॥ ४२ ॥
ना तरी उद्यानीं माधवी घडे ।
तेथ वनशोभेची खाणी उघडे ।
आदिलापासौनि अपाडें ।
जियापरी ॥ ४३ ॥
नानाघनीभूत सुवर्ण ।
जैसें न्याहाळितां साधारण ।
मग अलंकारीं बरवेपण ।
निवाडु दावी ॥ ४४ ॥
तैसें व्यासोक्ति अळंकारिलें ।
आवडे तें बरवेपण पातलें ।
तें जाणोनि काय आश्रयिलें ।
इतिहासीं ॥ ४५ ॥
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं ।
सानीव धरूनि आंगीं ।
पुराणें आख्यानरूपें जगीं ।
भारता आलीं ॥ ४६ ॥
म्हणौनि महाभारतीं नाहीं ।
तें नोहेचि लोकीं तिहीं ।
येणें कारणें म्हणिपे पाहीं ।
व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७ ॥
ऐसी जगीं सुरस कथा ।
जें जन्मभूमि परमार्था ।
मुनि सांगे नृपनाथा ।
जनमेजया ॥ ४८ ॥
जें अद्वितीय उत्तम ।
पवित्रैक निरुपम ।
परम मंगलधाम ।
अवधारिजो ॥ ४९ ॥
आतां भारतकमळपरागु ।
गीताख्यु प्रसंगु ।
जो संवादला श्रीरंगु ।
अर्जुनेंसीं ॥ ५० ॥
ना तरी शदब्रह्माब्धि ।
मथियला व्यासबुद्धि ।
निवडिलें निरवधि ।
नवनीत हें ॥ ५१ ॥
मग ज्ञानाग्निसंपर्कें ।
कडसिलेंनि विवेकें ।
पद आलें परिपाकें ।
आमोदासी ॥ ५२ ॥
जें अपेक्षिजे विरक्तीं ।
सदा अनुभविजे संतीं ।
सोहंभावें पारंगतीं ।
रमिजे जेथ ॥ ५३ ॥
जें आकर्णिजें भक्तीं ।
जें आदिवंद्य त्रिजगतीं ।
तें भीष्मपर्वीं संगती ।
म्हणितली कथा ॥ ५४ ॥
जें भगवद्गीता म्हणिजे ।
जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे ।
जें सनकादिकीं सेविजे ।
आदरेंसीं ॥ ५५ ॥
जैसें शारदीचिये चंद्रकळे ।
माजि अमृतकण कोंवळे ।
ते वेंचिती मनें मवाळें ।
चकोरतलगें ॥ ५६ ॥
तियापरी श्रोतां ।
अनुभवावी हे कथा ।
अतिहळुवारपण चित्ता ।
आणूनियां ॥ ५७ ॥
हें शब्देंवीण संवादिजे ।
इंद्रियां नेणतां भोगिजे ।
बोलाआधि झोंबिजे ।
प्रमेयासी ॥ ५८ ॥
जैसे भ्रमर परागु नेती ।
परी कमळदळें नेणती ।
तैसी परी आहे सेविती ।
ग्रंथीं इये ॥ ५९ ॥
कां आपुला ठावो न सांडितां ।
आलिंगिजे चंद्रु प्रकटतां ।
हा अनुरागु भोगितां ।
कुमुदिनी जाणे ॥ ६० ॥
ऐसेनि गंभीरपणें ।
स्थिरावलोनि अंतःकरणें ।
आथिला तोचि जाणें ।
मानूं इये ॥ ६१ ॥
अहो अर्जुनाचिये पांती ।
जे परिसणया योग्य होती ।
तिहीं कृपा करूनि संतीं ।
अवधान द्यावें ॥ ६२ ॥
हें सलगी म्यां म्हणितलें ।
चरणां लागोनि विनविलें ।
प्रभू सखोल हृदय आपुलें ।
म्हणौनियां ॥ ६३ ॥
जैसा स्वभावो मायबापांचा ।
अपत्य बोले जरी बोबडी वाचा ।
तरी अधिकचि तयाचा ।
संतोष आथी ॥ ६४ ॥
तैसा तुम्हीं मी अंगिकारिला ।
सज्जनीं आपुला म्हणितला ।
तरी उणें सहजें उपसाहला ।
प्रार्थूं कायी ॥ ६५ ॥
परी अपराधु तो आणिक आहे ।
जे मी गीतार्थु कवळुं पाहें ।
तें अवधारा विनवूं लाहें ।
म्हणौनियां ॥ ६६ ॥
हें अनावर न विचारितां ।
वायांचि धिंवसा उपनला चित्ता ।
येर्हनवीं भानुतेजीं काय खद्योता ।
शोभा आथी ॥ ६७ ॥
कीं टिटिभू चांचुवरी ।
माप सूये सागरीं ।
मी नेणतु त्यापरी ।
प्रवर्तें येथ ॥ ६८ ॥
आइका आकाश गिंवसावें ।
तरी आणीक त्याहूनि थोर होआवें ।
म्हणौनि अपाडू हें आघवें ।
निर्धारितां ॥ ६९ ॥
या गीतार्थाची थोरी ।
स्वयें शंभू विवरी ।
जेथ भवानी प्रश्नु करी ।
चमत्कारौनि ॥ ७० ॥
तेथ हरु म्हणे नेणिजे ।
देवी जैसें कां स्वरूप तुझें ।
तैसें हें नित्य नूतन देखिजे ।
गीतातत्व ॥ ७१ ॥
हा वेदार्थ सागरु ।
जया निद्रिताचा घोरु ।
तो स्वयें सर्वेश्वरु ।
प्रत्यक्ष अनुवादला ॥ ७२ ॥
ऐसे जें अगाध ।
जेथ वेडावती वेद ।
तेथ अल्प मी मतिमंद ।
काई होये ॥ ७३ ॥
हें अपार कैसेनि कवळावें ।
महातेज कवणें धवळावें ।
गगन मुठीं सुवावें ।
मशकें केवीं ? ॥ ७४ ॥
परी एथ असे एकु आधारु ।
तेणेंचि बोले मी सधरु ।
जे सानुकूळ श्रीगुरु ।
ज्ञानदेवो म्हणे ॥ ७५ ॥
येर्हनवीं तरी मी मुर्खु ।
जरी जाहला अविवेकु ।
तर्हीन संतकृपादीपकु ।
सोज्वळु असे ॥ ७६ ॥
लोहाचें कनक होये ।
हें सामर्थ्य परिसींच आहे ।
कीं मृतही जीवित लाहे ।
अमृतसिद्धि ॥ ७७ ॥
जरी प्रकटे सिद्धसरस्वती ।
तरी मुकयाहि आथी भारती ।
एथ वस्तुसामर्थ्यशक्ति ।
नवल कयी ॥ ७८ ॥
जयातें कामधेनु माये ।
तयासी अप्राप्य कांहीं आहे ।
म्हणौनि मी प्रवर्तों लाहें ।
ग्रंथीं इये ॥ ७९ ॥
तरी न्यून ते पुरतें ।
अधिक तें सरतें ।
करूनि घेयावें हें तुमतें ।
विनवितु असे ॥ ८० ॥
आतां देईजो अवधान ।
तुम्हीं बोलविल्या मी बोलेन ।
जैसे चेष्टे सूत्राधीन ।
दारुयंत्र ॥ ८१ ॥
तैसा मी अनुग्रहीतु ।
साधूंचा निरूपितु ।
ते आपुलियापरी अलंकारितु ।
भलतयापरी ॥ ८२ ॥
तंव श्रीगुरु म्हणती राहीं ।
हे तुज बोलावें नलगे कांहीं ।
आतां ग्रंथा चित्त देईं ।
झडकरी वेगां ॥ ८३ ॥
या बोला निवृत्तिदासु ।
पावूनि परम उल्हासु ।
म्हणे परियसा मना अवकाशु ।
देऊनियां ॥ ८४ ॥
धृतराष्ट्र उवाच ।
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव
किमकुर्वत संजय ॥ १ ॥
तरी पुत्रस्नेहें मोहितु ।
धृतराष्ट्र असे पुसतु ।
म्हणे संजया सांगे मातु ।
कुरुक्षेत्रींची ॥ ८५ ॥
जें धर्मालय म्हणिजे ।
तेथ पांडव आणि माझे ।
गेले असती व्याजें ।
जुंझाचेनि ॥ ८६ ॥
तरी तेचि येतुला अवसरीं ।
काय किजत असे येरयेरीं ।
ते झडकरी कथन करी ।
मजप्रती ॥ ८७ ॥
संजय उवाच ।
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥ २ ॥
तिये वेळीं तो संजय बोले ।
म्हणे पांडव सैन्य उचललें ।
जैसें महाप्रळयीं पसरलें ।
कृतांतमुख ॥ ८८ ॥
तैसें तें घनदाट ।
उठावलें एकवाट ।
जैसें उसळलें काळकूट ।
धरी कवण ॥ ८९ ॥
नातरी वडवानळु सादुकला ।
प्रळयवातें पोखला ।
सागरु शोषूनि उधवला ।
अंबरासी ॥ ९० ॥
तैसें दळ दुर्धर ।
नानाव्यूहीं परीकर ।
अवगमलें भयासुर ।
तिये काळीं ॥ ९१ ॥
तें देखोनियां दुर्योधनें ।
अव्हेरिलें कवणें मानें ।
जैसे न गणिजे पंचाननें ।
गजघटांतें ॥ ९२ ॥
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य
महतीं चमूम् ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण
तव शिष्येण धीमता ॥ ३ ॥
मग द्रोणापासीं आला ।
तयांतें म्हणे हा देखिला ।
कैसा दळभारू उचलला ।
पांडवांचा ॥ ९३ ॥
गिरिदुर्ग जैसे चालते ।
तैसे विविध व्यूह सभंवते ।
रचिले आथी बुद्धिमंतें ।
द्रुपदकुमरें ॥ ९४ ॥
जो हा तुम्हीं शिक्षापिला ।
विद्या देऊनि कुरुठा केला ।
तेणें हा सैन्यसिंहु पाखरिला ।
देख देख ॥ ९५ ॥
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥ ४ ॥
आणिकही असाधारण ।
जे शस्त्रास्त्रीं प्रवीण ।
क्षात्रधर्मीं निपुण ।
वीर आहाती ॥ ९६ ॥
जे बळें प्रौढी पौरुषें ।
भीमार्जुनांसारिखे ।
ते सांगेन कौतुकें ।
प्रसंगेची ॥ ९७ ॥
एथ युयुधानु सुभटु ।
आला असे विराटु ।
महारथी श्रेष्ठु ।
द्रुपद वीरु ॥ ९८ ॥
धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान् ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च
शैब्यश्च नरपुंगवः ॥ ५ ॥
युधामन्युश्च विक्रान्त
उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च
सर्व एव महारथाः ॥ ६ ॥
चेकितान धृष्टकेतु ।
काशिराज वीर विक्रांतु ।
उत्तमौजा नृपनाथु ।
शैब्य देख ॥ ९९ ॥
हा कुंतिभोज पाहें ।
एथ युधामन्यु आला आहे ।
आणि पुरुजितादि राय हे ।
सकळ देख ॥ १०० ॥
हा सुभद्राहृदयनंदनु ।
जो अपरु नवार्जुनु ।
तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु ।
देखें द्रोणा ॥ १०१ ॥
आणीकही द्रौपदीकुमर ।
हे सकळही महारथी वीर ।
मिती नेणिजे परी अपार ।
मीनले असती ॥ १०२ ॥
अस्माकं तु विशिष्टा ये
तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य
संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥ ७ ॥
भवान्भीष्मश्च कर्णश्च
कृपश्च समितिंजयः ।
अश्वत्थामा विकर्णश्च
सौमदत्तिस्तथैव च ॥ ८ ॥
आतां आमुच्या दळीं नायक ।
जे रूढवीर सैनिक ।
ते प्रसंगें आइक ।
सांगिजती ॥ १०३ ॥
उद्देशें एक दोनी ।
जायिजती बोलोनी ।
तुम्ही आदिकरूनी ।
मुख्य जे जें ॥ १०४ ॥
हा भीष्म गंगानंदनु ।
जो प्रतापतेजस्वी भानु ।
रिपुगजपंचाननु ।
कर्णवीरु ॥ १०५ ॥
या एकेकाचेनी मनोव्यापारें ।
हें विश्व होय संहरे ।
हा कृपाचार्यु न पुरे ।
एकलाचि ॥ १०६ ॥
एथ विकर्ण वीरु आहे ।
हा अश्वत्थामा पैल पाहें ।
याचा आडदरु सदां वाहे ।
कृतांतु मनीं ॥ १०७ ॥
अन्ये च बहवः शूरा
मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः
सर्वे युद्धविशारदाः ॥ ९ ॥
समितिंजयो सौमदत्ती ।
ऐसे आणीकही बहुत आहाती ।
जयांचिया बळा मिती ।
धाताही नेणें ॥ १०८ ॥
जे शास्त्रविद्यापारंगत ।
मंत्रावतार मूर्त ।
हो कां जें अस्त्रजात ।
एथूनि रूढ ॥ १०९ ॥
हे अप्रतिमल्ल जगीं ।
पुरता प्रतापु अंगीं ।
परी सर्व प्राणें मजलागीं ।
आरायिले असती ॥ ११० ॥
पतिव्रतेचें हृदय जैसें ।
पतिवांचूनि न स्पर्शे ।
मी सर्वस्व या तैसें ।
सुभटांसी ॥ १११ ॥
आमुचिया काजाचेनि पाडें ।
देखती आपुलें जीवित थोकडें ।
ऐसे निरवधि चोखडें ।
स्वामिभक्त ॥ ११२ ॥
झुंजती कुळकणी जाणती ।
कळे किर्तीसी जिती ।
हे बहु असो क्षात्रनीति ।
एथोनियां ॥ ११३ ॥
ऐसे सर्वांपरि पुरते ।
वीर दळीं आमुते ।
आतं काय गणूं यांतें ।
अपार हे ॥ ११४ ॥
अपर्याप्तं तदस्माकं बलं
भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं
भीमाभिरक्षितम् ॥ १०॥
वरी क्षत्रियांमाजी श्रेष्ठु ।
जो जगजेठी जगीं सुभटु ।
तया दळवैपणाचा पाटु ।
भीष्मासि पैं ॥ ११५ ॥
आतां याचेनि बळें गवसलें ।
हे दुग जैसे पन्नासिलें ।
येणें पाडें थेकुलें ।
लोकत्रय ॥ ११६ ॥
आधींच समुद्र पाहीं ।
तेथ दुवाडपण कवणा नाहीं ।
मग वडवानळु तैसे याही ।
विरजा जैसा ॥ ११७ ॥
ना तरीं प्रळयवन्ही महावातु ।
या दोघां जैसा सांधातु ।
तैसा हा गंगासुतु ।
सेनापति ॥ ११८ ॥
आतां येणेंसि कवण भिडे ।
हें पांडवसैन्य कीर थोकडें ।
परि वरचिलेनि पाडें ।
दिसत असे ॥ ११९ ॥
वरी भीमसेनु बेथु ।
तो जाहला असे सेनानाथु ।
ऐसें बोलोनियां मातु ।
सांडिली तेणें ॥ १२० ॥
अयनेषु च सर्वेषु
यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु
भवन्तः सर्व एव हि ॥ ११ ॥
मग पुनरपि काय बोले ।
सकळ सैनिकांतें म्हणितलें ।
आतां दळभार आपुलाले ।
सरसे करा ॥ १२१ ॥
जया जिया अक्षौहिणी ।
तेणें तिया आरणी ।
वरगण कवणकवणी ।
महारथीया ॥ १२२ ॥
तेणें तिया आवरिजे ।
भीष्मातळीं राहिजे ।
द्रोणातें म्हणे पाहिजे ।
तुम्ही सकळ ॥ १२३ ॥
हाचि एकु रक्षावा ।
मी तैसा हा देखावा ।
येणें दळभारु आघवा ।
साचु आमुचा ॥ १२४ ॥
तस्य संजनयन्हर्षं
कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्योच्चैः शंखं
दध्मौ प्रतापवान् ॥ १२ ॥
या राजयाचिया बोला ।
सेनापति संतोषला ।
मग तेणें केला ।
सिंहनादु ॥ १२५ ॥
तो गाजत असे अद्भुनतु ।
दोन्ही सैन्याआंतु ।
प्रतिध्वनि न समातु ।
उपजत असे ॥ १२६ ॥
तयाचि तुलगासवें ।
वीरवृत्तीचेनि थावें ।
दिव्य शंख भीष्मदेवें ।
आस्फुरिला ॥ १२७ ॥
ते दोन्ही नाद मीनले ।
तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहलें ।
जैसें आकाश कां पडिलें ।
तुटोनिया ॥ १२८ ॥
घडघडीत अंबर ।
उचंबळत सागर ।
क्षोभलें चराचर ।
कांपत असे ॥ १२९ ॥
तेणें महाघोषगजरें ।
दुमदुमिताती गिरिकंदरें ।
तव दळामाजीं रणतुरें ।
आस्फुरिलीं ॥ १३० ॥
ततः शंखाश्च भेर्यश्च
पणवानकगोमुखाः ।
सहसैवाभ्यहन्यन्त स
शब्दस्तुमुलोऽभवत् ॥ १३ ॥
उदंड सैंघ वाजतें ।
भयानखें खाखातें ।
महाप्रळयो जेथें ।
धाकडांसी ॥ १३१ ॥
भेरी निशाण मांदळ ।
शंख काहळ भोंगळ ।
आणि भयासुर रणकोल्हाळ ।
सुभटांचे ॥ १३२ ॥
आवेशें भुजा त्राहाटिती ।
विसणेले हांका देती ।
जेथ महामद भद्रजाती ।
आवरती ना ॥ १३३ ॥
तेथ भेडांची कवण मातु ।
कांचया केर फिटतु ।
जेणें दचकला कृतांतु ।
आंग नेघे ॥ १३४ ॥
एकां उभयाचि प्राण गेले ।
चांगांचे दांत बैसले ।
बिरुदाचे दादुले ।
हिंवताती ॥ १३५ ॥
ऐसा अद्भुत तूरबंबाळु ।
ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु ।
देव म्हणती प्रळयकाळु ।
वोढवला आजी ॥ १३६ ॥
ततः श्वेतैहयैर्युक्ते
महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पाण्डवश्चैव
दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः ॥ १४ ॥
पाञ्चजन्यं हृषीकेशो
देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्ड्रं दध्मौ महाशंखं
भीमकर्मा वृकोदरः ॥ १५ ॥
अनन्तविजयं राजा
कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्च
सुघोषमणिपुष्पकौ ॥ १६ ॥
ऐसी स्वर्गीं मातु ।
देखोनि तो आकांतु ।
तव पांडवदळाआंतु ।
वर्तलें कायी ॥ १३७ ॥
हो कां निजसार विजयाचें ।
कीं तें भांडार महातेजाचें ।
जेथ गरुडाचिये जावळियेचे ।
कांतले चार्ही ॥ १३८ ॥
कीं पाखांचा मेरु जैसा ।
रहंवरु मिरवतसे तैसा ।
तेजें कोंदाटलिया दिशा ।
जयाचेनि ॥ १३९ ॥
जेथ अश्ववाहकु आपण ।
वैकुंठींचा राणा जाण ।
तया रथाचे गुण ।
काय वर्णूं ॥ १४० ॥
ध्वजस्तंभावरी वानरु ।
तो मुर्तिमंत शंकरु ।
सारथी शारङ्गधरु ।
अर्जुनेसीं ॥ १४१ ॥
देखा नवल तया प्रभूचें ।
अद्भु॥त प्रेम भक्ताचें ।
जें सारथ्यपण पार्थाचें ।
करितु असे ॥ १४२ ॥
पाइकु पाठींसी घातला ।
आपण पुढां राहिला ।
तेणें पाञ्चजन्यु आस्फुरिला ।
अवलीळाचि ॥ १४३ ॥
परि तो महाघोषु थोरु ।
गर्जतु असे गंहिरु ।
जैसा उदेला लोपी दिनकरु ।
नक्षत्रांतें ॥ १४४ ॥
तैसें तुरबंबाळु भंवते ।
कौरवदळीं गाजत होते ।
ते हारपोनि नेणों केउते ।
गेले तेथ ॥ १४५ ॥
तैसाचि देखे येरे ।
निनादें अति गहिरे ।
देवदत्त धनुर्धरें ।
आस्फुरिला ॥ १४६ ॥
ते दोन्ही शब्द अचाट ।
मिनले एकवट ।
तेथ ब्रह्मकटाह शतकूट ।
हों पाहत असे ॥ १४७ ॥
तंव भीमसेनु विसणैला ।
जैसा महाकाळु खवळला ।
तेणें पौण्ड्र आस्फुरिला ।
महाशंखु ॥ १४८ ॥
तो महाप्रलयजलधरु ।
जैसा घडघडिला गहिंरु ।
तंव अनंतविजयो युधिष्ठिरु ।
आस्फुरित असे ॥ १४९ ॥
नकुळें सुघोषु ।
सहदेवें मणिपुष्पकु ।
जेणें नादें अंतकु ।
गजबजला ठाके ॥ १५० ॥
काश्यश्च परमेष्वासः
शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्च
सात्यकिश्चापराजितः ॥ १७ ॥
द्रुपदो द्रौपदेयाश्च
सर्वशः पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहुः शंखान्दध्मुः
पृथक् पृथक् ॥ १८ ॥
स घोषो धार्तराष्ट्राणां
हृदयानि व्यदारयत् ।
नभश्च पृथिवीं चैव
तुमुलो व्यनुनादयन् ॥ १९ ॥
तेथ भूपति होते अनेक ।
द्रुपद द्रौपदेयादिक ।
हा काशीपति देख ।
महाबाहु ॥ १५१ ॥
तेथ अर्जुनाचा सुतु ।
सात्यकि अपराजितु ।
धृष्टद्युम्नु नृपनाथु ।
शिखंडी हन ॥ १५२ ॥
विराटादि नृपवर ।
जे सैनिक मुख्य वीर ।
तिहीं नानाशंख निरंतर ।
आस्फुरिले ॥ १५३ ॥
तेणें महाघोषनिर्घातें ।
शेष कूर्म अवचितें ।
गजबजोनि भूभारातें ।
सांडूं पाहती ॥ १५४ ॥
तेथ तीन्ही लोक डळमळित ।
मेरु मांदार आंदोळित ।
समुद्रजळ उसळत ।
कैलासवेरी ॥ १५५ ॥
पृथ्वीतळ उलथों पहात ।
आकाश असे आसुडत ।
तेथ सडा होत ।
नक्षत्रांचा ॥ १५६ ॥
सृष्टी गेली रे गेली ।
देवां मोकळवादी जाहली ।
ऐशी एक टाळी पिटली ।
सत्यलोकीं ॥ १५७ ॥
दिहाचि दिन थोकला ।
जैसा प्रलयकाळ मांडला ।
तैसा हाहाकारु जाहला ।
तिन्हीं लोकीं ॥ १५८ ॥
तें देखोनि आदिपुरुषु विस्मितु ।
म्हणे झणें होय पां अंतु ।
मग लोपिला अद्भुुतु ।
संभ्रमु तो ॥ १५९ ॥
म्हणौनि विश्व सांवरलें ।
एर्हभवीं युगांत होतें वोडवलें ।
जैं महाशंख आस्फुरिले ।
कृष्णादिकीं ॥ १६० ॥
तो घोष तरी उपसंहरला ।
परि पडिसाद होता राहिला ।
तेणें दळभार विध्वंसिला ।
कौरवांचा ॥ १६१ ॥
जैसा गजघटाआंतु ।
सिंह लीला विदारितु ।
तैसा हृदयातें भेदितु ।
कौरवांचिया ॥ १६२ ॥
तो गाजत जंव आइकती ।
तंव उभेचि हिये घालिती ।
एकमेकांतें म्हणती ।
सावध रे सावध ॥ १६३ ॥
अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा
धार्तराष्ट्रान् कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते
धनुरुद्यम्य पाण्डवः ॥ २० ॥
तेथ बळें प्रौढीपुरतें ।
महारथी वीर होते ।
तिहीं पुनरपि दळातें ।
आवरिलें ॥ १६४ ॥
मग सरिसेपणें उठावले ।
दुणवटोनि उचलले ।
तया दंडीं क्षोभलें ।
लोकत्रय ॥ १६५ ॥
तेथ बाणवरी धर्नुधर ।
वर्षताती निरंतर ।
जैसे प्रळयांत जलधर ।
अनिवार कां ॥ १६६ ॥
ते देखलिया अर्जुनें ।
संतोष घेऊनि मनें ।
मग संभ्रमें दिठी सेने ।
घालीतसे ॥ १६७ ॥
तंव संग्रामीं सज्ज जाहले ।
सकळ कौरव देखिले ।
तंव लीलाधनुष्य उचललें ।
पंडुकुमरें ॥ १६८ ॥
अर्जुन उवाच ।
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
सेनयोरुभयोर्मध्ये रथं
स्थापय मेऽच्युत ॥ २१ ॥
यावदेतान्निरिक्षेऽहं
योद्धुकामानवस्थितान् ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन्
रणसमुद्यमे ॥ २२ ॥
योत्स्यमानानवेक्षेऽहं
य एतेऽत्र समागताः ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे
प्रियचिकीर्षवः ॥ २३ ॥
ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा ।
आतां झडकरी रथु पेलावा ।
नेऊनि मध्यें घालावा ।
दोहीं दळां ॥ १६९ ॥
जंव मी नावेक ।
हे सकळ वीर सैनिक ।
न्याहाळीन अशेख ।
झुंजते ते ॥ १७० ॥
येथ आले असती आघवें ।
परी कवणेंसीं म्यां झुंजावें ।
हे रणीं लागे पहावें ।
म्हणौनियां ॥ १७१ ॥
बहुतकरूनि कौरव ।
हे आतुर दुःस्वभाव ।
वांटिवेवीण हांव ।
बांधिती झुंजीं ॥ १७२ ॥
झुंजाची आवडी धरिती ।
परी संग्रामीं धीर नव्हती ।
हें सांगोनि रायाप्रती ।
काय संजयो म्हणे ॥ १७३ ॥
सञ्जय उवाच ।
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये
स्थापयित्वा रथोत्तमम् ॥ २४ ॥
भीष्मद्रोणप्रमुखतः
सर्वेषां च महीक्षिताम् ।
उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति ॥ २५ ॥
तत्रापश्यत्स्थितान्पार्थः
पितृनथ पितामहान् ।
आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ॥ २६ ॥
श्वशुरान्सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
तान्समीक्ष्य स कौन्तेयः
सर्वान्बन्धूनवस्थितान् ॥ २७ ॥
कृपया परयाऽऽविष्टो विषीदमब्रवीत् ।
आइका अर्जुन इतुकें बोलिला ।
तंव श्रीकृष्णें रथु पेलिला ।
दोही सैन्यांमाजीं केला । उभा तेणें ॥ ७४ ॥
जेथ भीष्मद्रोणादिक ।
जवळिकेचि सन्मुख ।
पृथिवीपति आणिक ।
बहुत आहाती ॥ ७५ ॥
तेथ स्थिर करूनियां रथु ।
अर्जुन असे पाहातु ।
तो दळभार समस्तु ।
संभ्रमेंसीं ॥ ७६ ॥
मग देवा म्हणे देख देख ।
हे गुरुगोत्र अशेख ।
तंव कृष्णमनीं नावेक ।
विस्मो जाहला ॥ ७७ ॥
तो आपणयां आपण म्हणे ।
एथ कायी कवण जाणे ।
हें मनीं धरलें येणें ।
परि कांहीं आश्चर्य असे ॥ ७८ ॥
ऐसी पुढील से घेतु ।
तो सहजें जाणें हृदयस्थु ।
परि उगा असे निवांतु ।
तिये वेळीं ॥ १७९ ॥
तंव तेथ पार्थु सकळ ।
पितृ पितामह केवळ ।
गुरु बंधु मातुळ ।
देखता जाहला ॥ १८० ॥
इष्ट मित्र आपुले ।
कुमरजन देखिले ।
हे सकळ असती आले ।
तयांमाजी ॥ १८१ ॥
सुहृज्जन सासरे ।
आणीकही सखे सोइरे ।
कुमर पौत्र धर्नुर्धरें ।
देखिले तेथ ॥ १८२ ॥
जयां उपकार होते केले ।
कीं आपदीं जे रक्षिले ।
हे असो वडील धाकुले ।
आदिकरूनि ॥ १८३ ॥
ऐसें गोत्रचि दोहीं दळीं ।
उदित जालें असे कळीं ।
हे अर्जुनें तिये वेळीं ।
अवलोकिलें ॥ १८४ ॥
तेथ मनीं गजबज जाहली ।
आणि आपैसी कृपा आली ।
तेणें अपमानें निघाली ।
वीरवृत्ति ॥ १८५ ॥
जिया उत्तम कुळींचिया होती ।
आणि गुणलावण्य आथी ।
तिया आणिकीतें न साहती ।
सुतेजपणें ॥ १८६ ॥
नविये आवडीचेनि भरें ।
कामुक निजवनिता विसरे ।
मग पाडेंवीण अनुसरे ।
भ्रमला जैसा ॥ १८७ ॥
कीं तपोबळें ऋद्धी ।
पातलिया भ्रंशे बुद्धी ।
मग तया विरक्तता सिद्धी ।
आठवेना ॥ १८८ ॥
तैसें अर्जुना तेथ जाहलें ।
असतें पुरुषत्व गेलें ।
जे अंतःकरण दिधलें ।
कारुण्यासी ॥ १८९ ॥
देखा मंत्रज्ञु बरळु जाय ।
मग तेथ कां जैसा संचारु होय ।
तैसा तो धनुर्धर महामोहें ।
आकळिला ॥ १९० ॥
म्हणौनि असतां धीरु गेला ।
हृदया द्रावो आला ।
जैसा चंद्रकळीं शिवतला ।
सोमकांतु ॥ १९१ ॥
तयापरी पार्थु ।
अतिस्नेहें मोहितु ।
मग सखेद असे बोलतु ।
श्रीअच्युतेसीं ॥ १९२ ॥
अर्जुन उवाच ।
दृष्ट्वेमम् स्वजनं कृष्ण
युयुत्सुम् समुपस्थितम् ॥ २८ ॥
सीदन्ति मम गात्राणि
खं च परिशुष्यति ।
वेपथुश्च शरीरे मे
रोमहर्षश्च जायते ॥ २९ ॥
गाण्डीवं स्रंसते हस्तात्
त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥ ३० ॥
तो म्हणे अवधारी देवा ।
म्यां पाहिला हा मेळावा ।
तंव गोत्र वर्गु आघवा ।
देखिला एथ ॥ १९३ ॥
हें संग्रामीं उदित ।
जहाले असती कीर समस्त ।
पण आपणपेयां उचित ।
केवीं होय ॥ १९४ ॥
येणें नांवेचि नेणों कायी ।
मज आपणपें सर्वथा नाहीं ।
मन बुद्धि ठायीं ।
स्थिर नोहे ॥ १९५ ॥
देखे देह कांपत ।
तोंड असे कोरडें होत ।
विकळता उपजत ।
गात्रांसीही ॥ १९६ ॥
सर्वांगा कांटाळा आला ।
अति संतापु उपनला ।
तेथ बेंबळ हातु गेला ।
गांडिवाचा ॥ १९७ ॥
तें न धरतचि निष्टलें ।
परि नेणेंचि हातोनि पडिलें ।
ऐसें हृदय असे व्यापिलें ।
मोहें येणें ॥ १९८ ॥
जें वज्रापासोनि कठिण ।
दुर्धर अतिदारुण ।
तयाहून असाधारण ।
हें स्नेह नवल ॥ १९९ ॥
जेणें संग्रामीं हरु जिंतिला ।
निवातकवचांचा ठावो फेडिला ।
तो अर्जुन मोहें कवळिला ।
क्षणामाजीं ॥ २०० ॥
जैसा भ्रमर भेदी कोडें ।
भलतैसें काष्ठ कोरडें ।
परि कळिकेमाजी सांपडे ।
कोंवळिये ॥ २०१ ॥
तेथ उत्तीर्ण होईल प्राणें ।
परि तें कमळदळ चिरूं नेणें ।
तैसें कठिण कोवळेपणें ।
स्नेह देखा ॥ २०२ ॥
हे आदिपुरुषाची माया ।
ब्रह्मेयाही नयेचि आया ।
म्हणौनि भुलविला ऐकें राया ।
संजयो म्हणे ॥ २०३ ॥
अवधारी मग तो अर्जुनु ।
देखोनि सकळ स्वजनु ।
विसरला अभिमानु ।
संग्रामींचा ॥ २०४ ॥
कैसी नेणों सदयता ।
उपनली तेथें चित्ता ।
मग म्हणे कृष्णा आतां ।
नसिजे एथ ॥ २०५ ॥
माझें अतिशय मन व्याकुळ ।
होतसे वाचा बरळ ।
जे वधावे हे सकळ ।
येणें नांवें ॥ २०६ ॥
निमित्तानि च पश्यामि
विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि
हत्वा स्वजनमाहवे ॥ ३१ ॥
या कौरवां जरी वधावें ।
तरी युधिष्ठीरादिकां कां न वधावें ।
हे येरयेर आघवे ।
गोत्रज आमुचे ॥ २०७ ॥
म्हणोनि जळो हें झुंज ।
प्रत्यया न ये मज ।
एणें काय काज ।
महापापें ॥ २०८ ॥
देवा बहुतापरी पाहतां ।
एथ वोखटे होईल झुंजतां ।
वर कांहीं चुकवितां ।
लाभु आथी ॥ २०९ ॥
न कांक्षे विजयं कृष्ण न च
राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं
भोगैर्जीवितेन वा ॥ ३२ ॥
येषामर्थे कांक्षितं नो राज्यं
भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे
प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ ३३ ॥
आचार्याः पितरः
पुत्रास्तथैव च पितामहाः ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः
श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥ ३४ ॥
तया विजयवृत्ती कांहीं ।
मज सर्वथा काज नाहीं ।
एथ राज्य तरी कायी ।
हे पाहुनियां ॥ २१० ॥
या सकळांतें वधावें ।
मग हे भोग भोगावे ।
ते जळोत आघवे ।
पार्थु म्हणे ॥ २११ ॥
तेणें सुखेंविण होईल ।
तें भलतैसें साहिजेल ।
वरी जीवितही वेंचिजेल ।
याचिलागीं ॥ २१२ ॥
परी यांसी घातु कीजे ।
मग आपण राज्यसुख भोगिजे ।
हें स्वप्नींही मन माझें ।
करूं न शके ॥ २१३ ॥
तरी आम्हीं कां जन्मावें ।
कवणलागीं जियावें ।
जरी वडिलां यां चिंतावें ।
विरुद्ध मनें ॥ २१४ ॥
पुत्रातें इच्छी कुळ ।
तयाचें कायि हेंचि फळ ।
जे निर्दळिजे केवळ ।
गोत्र आपुलें ॥ २१५ ॥
हें मनींचि केविं धरिजे ।
आपण वज्राचेया होईजे ।
वरी घडे तरी कीजे ।
भलें इयां ॥ २१६ ॥
आम्हीं जें जें जोडावें ।
तें समस्तीं इहीं भोगावें ।
हें जीवितही उपकारावें ।
काजीं यांच्या ॥ २१७ ॥
आम्ही दिगंतीचे भूपाळ ।
विभांडूनि सकळ ।
मग संतोषविजे कुळ ।
आपुलें जें ॥ २१८ ॥
तेचि हे समस्त ।
परी कैसें कर्म विपरीत ।
जे जाहले असती उद्यत ।
झुंजावया ॥ २१९ ॥
अंतौरिया कुमरें ।
सांडोनियां भांडारें ।
शस्त्राग्रीं जिव्हारें ।
आरोपुनी ॥ २२० ॥
ऐसियांतें कैसेनि मारूं ? ।
कवणावरी शस्त्र धरूं ? ।
निजहृदया करूं ।
घातु केवीं ? ॥ २२१ ॥
हें नेणसी तूं कवण ।
परी पैल भीष्म द्रोण ।
जयांचे उपकार असाधारण ।
आम्हां बहुत ॥ २२२ ॥
एथ शालक सासरे मातुळ ।
आणि बंधु कीं हे सकळ ।
पुत्र नातू केवळ ।
इष्टही असती ॥ २२३ ॥
अवधारी अति जवळिकेचे ।
हे सकळही सोयरे आमुचे ।
म्हणौनि दोष आथी वाचे ।
बोलितांचि ॥ २२४ ॥
एतान्न हन्तुमिच्छामि
घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः
किं नु महीकृते ॥ ३५ ॥
हे वरी भलतें करितु ।
आतांचि येथें मारितु ।
परि आपण मनें घातु ।
न चिंतावा ॥ २२५ ॥
त्रैलोक्यींचें अनकळित ।
जरी राज्य होईल प्राप्त ।
तरी हें अनुचित ।
नाचरें मी ॥ २२६ ॥
जरी आजि एथ ऐसें कीजे ।
तरी कवणाच्या मनीं उरिजे ? ।
सांगे मुख केवीं पाहिजे ।
तुझें कृष्णा ? ॥ २२७ ॥
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का
प्रीतिः स्याज्जनार्दन ।
पापमेवाऽऽश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥ ३६ ॥
जरी वधु करोनि गोत्रजांचा ।
तरी वसौटा होऊनि दोषांचा ।
मज जोडिलासि तुं हातींचा ।
दूरी होसी ॥ २२८ ॥
कुळहरणीं पातकें ।
तिये आंगीं जडती अशेखें ।
तये वेळीं तुं कवणें कें ।
देखावासी ? ॥ २२९ ॥
जैसा उद्यानामाजीं अनळु ।
संचारला देखोनि प्रबळु ।
मग क्षणभरी कोकिळु ।
स्थिरु नोहे ॥ २३० ॥
का सकर्दम सरोवरु ।
अवलोकूनि चकोरु ।
न सेवितु अव्हेरु ।
करूनि निघे ॥ २३१ ॥
तयापरी तुं देवा ।
मज झकवूं न येसीं मावा ।
जरी पुण्याचा वोलावा ।
नाशिजैल ॥ २३२ ॥
तस्मान्नार्हा वयं हन्तुं
धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा
सुखिनः स्याम माधव ॥ ३७ ॥
म्हणोनि मी हें न करीं ।
इये संग्रामीं शस्त्र न धरीं ।
हें किडाळ बहुतीं परी ।
दिसतसे ॥ २३३ ॥
तुजसीं अंतराय होईल ।
मग सांगे आमुचें काय उरेल ? ।
तेणें दुःखें हियें फुटेल ।
तुजवीण कृष्णा ॥ २३४ ॥
म्हणौनि कौरव हे वधिजती ।
मग आम्ही भोग भोगिजती ।
हे असो मात अघडती ।
अर्जुन म्हणे ॥ २३५ ॥
यद्यप्येते न पश्यन्ति
लोभोपहतचेतसः ।
कुलक्षयकृतं दोषं
मित्रद्रोहे च पातकम् ॥ ३८ ॥
कथं न ज्ञेयमस्माभिः
पापादस्मान्निवर्तितुम् ।
कुलक्षयकृतं दोषं
प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ ३९ ॥
हे अभिमानमदें भुललें ।
जरी पां संग्रामा आले ।
तर्हीे आम्हीं हित आपुलें ।
जाणावें लागे ॥ २३६ ॥
हें ऐसें कैसें करावें ? ।
जे आपुले आपण मारावे ? ।
जाणत जाणतांचि सेवावें ।
काळकूट ? ॥ २३७ ॥
हां जी मार्गीं चालतां ।
पुढां सिंहु जाहला आवचिता ।
तो तंव चुकवितां ।
लाभु आथी ॥ २३८ ॥
असता प्रकाशु सांडावा ।
मग अंधकूप आश्रावा ।
तरी तेथ कवणु देवा ।
लाभु सांगे ? ॥ २३९ ॥
कां समोर अग्नि देखोनी ।
जरी न वचिजे वोसंडोनी ।
तरी क्षणा एका कवळूनी ।
जाळूं सके ॥ २४० ॥
तैसे दोष हे मूर्त ।
अंगी वाजों असती पहात ।
हें जाणतांही केवीं एथ ।
प्रवर्तावें ? ॥ २४१ ॥
ऐसें पार्थु तिये अवसरीं ।
म्हणे देवा अवधारीं ।
या कल्मषाची थोरी ।
सांगेन तुज ॥ २४२ ॥
कुलक्षये प्रणश्यन्ति
कुलधर्माः सनातनाः ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥ ४० ॥
जैसें कष्ठें काष्ठ मथिजे ।
तेथ वन्हि एक उपजे ।
तेणें काष्ठजात जाळिजे ।
प्रज्वळलेनि ॥ २४३ ॥
तैसा गोत्रींचीं परस्परें ।
जरी वधु घडे मत्सरें ।
तरी तेणें महादोषें घोरें ।
कुळचि नाशे ॥ २४४ ॥
म्हणौनि येणें पापें ।
वंशजधर्मु लोपे ।
मग अधर्मुचि आरोपे ।
कुळामाजीं ॥ २४५ ॥
अधर्माभिभवात्कृष्ण
प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय
जायते वर्णसङ्करः ॥ ४१ ॥
एथ सारासार विचारावें ।
कवणें काय आचारावें ।
आणि विधिनिषेध आघवे ।
पारुषती ॥ २४६ ॥
असता दीपु दवडिजे ।
मग अंधकारीं राहाटिजे ।
तरी उजूचि कां अडळिजे ।
जयापरी ॥ २४७ ॥
तैसा कुळीं कुळक्षयो होय ।
तये वेळीं तो आद्यधर्मु जाय ।
मग आन कांहीं आहे ।
पापावांचुनी ? ॥ २४८ ॥
जैं यमनियम ठाकती ।
तेथ इंद्रिये सैरा राहाटती ।
म्हणौनि व्यभिचार घडती ।
कुळस्त्रियांसी ॥ २४९ ॥
उत्तम अधमीं संचरती ।
ऐसे वर्णावर्ण मिसळती ।
तेथ समूळ उपडती ।
जातिधर्म ॥ २५० ॥
जैसी चोहटाचिये बळी ।
पाविजे सैरा काउळीं ।
तैसीं महापापें कुळीं ।
संचरती ॥ २५१ ॥
सङ्करो नरकायैव
कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां
लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥ ४२ ॥
मग कुळा तया अशेखा ।
आणि कुळघातकां ।
येरयेरां नरका ।
जाणें आथी ॥ २५२ ॥
देखें वंशवृद्धि समस्त ।
यापरी होय पतित ।
मग वोवांडिती स्वर्गस्थ ।
पूर्वपुरुष ॥ २५३ ॥
जेथ नित्यादि क्रिया ठाके ।
आणि नैमित्तिक क्रिया पारुखे ।
तेथ कवणा तिळोदकें ।
कवण अर्पी ? ॥ २५४ ॥
तरी पितर काय करिती ? ।
कैसेनि स्वर्गीं वसती ? ।
म्हणौनि तेही येती ।
कुळापासीं ॥ २५५ ॥
जैसा नखाग्रीं व्याळु लागे ।
तो शिखांत व्यापी वेगें ।
तेवीं आब्रह्म कुळ अवघें ।
आप्लविजे ॥ २५६ ॥
दोषैरेतैः कुलघ्नानां
वर्णसङ्करकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः
कुलधर्माश्च शाश्वताः ॥ ४३ ॥
उत्सन्नकुलधर्माणां
मनुष्याणां जनार्दन ।
नरके नियतं वासो
भवतीत्यनुशुश्रुम ॥ ४४ ॥
अहो बत महत्पापं
कर्तुं व्यवसिता वयम् ।
यद्राहज्यसुखलोभेन
हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ ४५ ॥
देवा अवधारी आणीक एक ।
एथ घडे महापातक ।
जे संगदोषें हा लौकिक ।
भ्रंशु पावे ॥ २५७ ॥
जैसा घरीं आपुला ।
वानिवसें अग्नि लागला ।
तो आणिकांहीं प्रज्वळिला ।
जाळूनि घाली ॥ २५८ ॥
तैसिया तया कुळसंगती ।
जे जे लोक वर्तती ।
तेही बाधा पावती ।
निमित्तें येणें ॥ २५९ ॥
तैसें नाना दोषें सकळ ।
अर्जुन म्हणे तें कुळ ।
मग महाघोर केवळ ।
निरय भोगी ॥ २६० ॥
पडिलिया तिये ठायीं ।
मग कल्पांतींही उकलु नाहीं ।
येसणें पतन कुळक्षयीं ।
अर्जुन म्हणे ॥ २६१ ॥
देवा हें विविध कानीं ऐकिजे ।
परी अझुनिवरी त्रासु नुपजे ।
हृदय वज्राचें हें काय कीजे ।
अवधारीं पां ॥ २६२ ॥
अपेक्षिजे राज्यसुख ।
जयालागीं तें तंव क्षणिक ।
ऐसे जाणतांही दोख ।
अव्हेरू ना ? ॥ २६३ ॥
जे हे वडिल सकळ आपुले ।
वधावया दिठी सूदले ।
सांग पां काय थेंकुलें ।
घडलें आम्हां ? ॥ २६४ ॥
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे
क्षेमतरं भवेत् ॥ ४६ ॥
आतां यावरी जें जियावें ।
तयापासूनि हें बरवें ।
जे शस्त्र सांडुनि साहावे ।
बाण यांचे ॥ २६५ ॥
तयावरी होय जितुकें ।
तें मरणही वरी निकें ।
परी येणें कल्मषें ।
चाड नाहीं ॥ २६६ ॥
ऐसें देखून सकळ ।
अर्जुनें आपुलें कुळ ।
मग म्हणे राज्य तें केवळ ।
निरयभोगु ॥ २६७ ॥
सञ्जय उवाच ।
एवमुक्त्वाऽर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ ४७ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे
अर्जुनविषादयोगोनाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
ऐसे तिये अवसरी ।
अर्जुन बोलिला समरीं ।
संजयो म्हणे अवधारीं ।
धृतराष्ट्रातें ॥ २६८ ॥
मग अत्यंत उद्वेगला ।
न धरत गहींवरु आला ।
तेथ उडी घातली खालां ।
रथौनियां ॥ २६९ ॥
जैसा राजकुमरु पदच्युतु ।
सर्वथा होय उपहतु ।
कां रवि राहुग्रस्तु ।
प्रभाहीनु ॥ २७० ॥
नातरी महासिद्धिसंभ्रमें ।
जिंतिला तापसु भ्रमें ।
मग आकळूनि कामें ।
दीनु कीजे ॥ २७१ ॥
तैसा तो धर्नुधरु ।
अत्यंत दुःखें जर्जरु ।
दिसे जेथ रहंवरु ।
त्यजिला तेणें ॥ २७२ ॥
मग धनुष्य बाण सांडिले ।
न धरत अश्रुपात आले ।
ऐसें ऐक राया वर्तलें ।
संजयो म्हणे ॥ २७३ ॥
आतां यापरी तो वैकुंठनाथु ।
देखोनि सखेद पार्थु ।
कवणेपरी परमार्थु ।
निरूपील ॥ २७४ ॥
ते सविस्तर पुढारी कथा ।
अति सकौतुक ऐकतां ।
ज्ञानदेव म्हणे आतां ।
निवृत्तिदासु ॥ २७५ ॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां
भावार्थदीपिकायां प्रथमोऽध्यायः ॥