बेकायदेशीर घर मालकी हक्क बदल - ग्रामपंचायत रामपूर येथे
बेकायदेशीर घर मालकी हक्क बदल - ग्रामपंचायत रामपूर येथे
महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा भ्रष्टाचारा विरुद्धचा लढा आणि संघर्ष!!!
Maharashtra Farmers Against Corruption
बेकायदेशीर घर मालकी हक्क बदल - ग्रामपंचायत रामपूर येथे
घनशाम गावडे यांनी आमच्या गावठाण सर्व्हे नंबर 103 या जमिनीवर बेकायदेशीरपणे आपले नाव नोंदवले आहे. प्रापर्टी कार्डनुसार सदरची सर्व्हे नंबर 103 गावठाण ही जमिन आजही जाधव एकत्रित कुटुंबाची मालमत्ता आहे. त्यावर बांधलले कच्चे गिरणी घर ही जाधव कुटुबाची मालमत्ता आहे. सहा भावांच्या मालकीचे हे घर सर्व वारसदारांच्या संमतीने कायदेशीरपणे नोंदवले गेले असल्याचा पुरावा देण्यात ग्रामपंचायत असफल झाले आहे. 2022 साली या आमच्या घराची पडझड दाखवून, सदर व्यक्तिने पन्नास हजार रुपयांची, महाराष्ट्र सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाईही मूळ मालकांना डावलून स्वतःच्या नावे वळवून घेतली. ही फक्त आमचीच नाही, तर माननीय महाराष्ट्र सरकारचीही फसवणूक आहे. ते घर आणि ती रक्कम मूळ मालकांना परत हस्तांतरिक करण्यासाठी उपाययोजना करण्यासही ग्रामपंचायत असफल ठरली.
जाधव कुटुंबाच्या एखाद्या कराराच्या नोंदीनुसार जर हे फेरबदल नोंदवलेले असतील, तर ग्रामपंचायतीने त्या करारातील सर्वंच नोंदीची व्यवस्थित पुर्तता केली गेली आहे का याची शहानिशा करणे गरजेचे होते. केवळ करारातील एखाद्या नोंदीचा फायदा उठवून, बाकी नोंदी अमलात आणल्या नसतील तर सदर नोंदही बाद / रद्द ठरवली जाणे आवश्यक असते. याचे कारण असे की, करार हा दोन्ही पक्षांसाठी समानपणे बाध्यकारी असतो.
मग सर्वांच्या सह्या नसताना ग्रामपंचायत रामपूर यांनी घनशाम गावडे यांचे नाव कसे चढवले हे गौडबंगालच आहे. (ही बाब 1995 नंतरची आहे. त्यावेळी आमच्या मोठ्या बाबाचा - कै भरमू जाधव यांचा मृत्यु झाला होता आणि सर्व्हे नंबर 103 गिरणी घरावर अमृत, राजू, आणि त्यांच्या बहिणींची नावे चढली होती.) ग्रामपंचायतीकडे आम्ही रितसर अर्ज करून त्या दस्तांच्या कॉपीची मागणी केली, नंतर RTI केले, तरी ते दस्त आम्हाला दिले गेले नाही. शिवाय ते गैरप्रकारे चढवलेले नाव काढावे याचीही मागणी केली होती. त्यावर मी RTI चे सेंकड अपिल टाकणार होतो. पण आपलेच दात आपलेच ओठ म्हणून गप्प बसलो. पण आता पाणी डोक्यावरून चालले आहे. आता सर्वांना सर्व गोष्टींचा हिशोब द्यावा लागणार आहे. यात ग्रामपंचायतीची काय भुमिका आहे, ते दस्त मिळाल्या शिवाय स्पष्ट होणार नाही.
कोणत्यातरी भांडणापायी एकसंध एकच घर असूनही मोठ्या बाबांच्या मुलींच्या लग्नात थोरलाबाबाने त्यांना आपल्या बाजूच्या दारात लग्नमंडप घालू दिला नाही. हळदी दिवशीच भांडणे काढली. पुढे मोठ्या बाबाचा अकस्मात मृत्यू झाला तेव्हाही - "बरं झालं मेला, गेली पिडा!" असे गैर बोलल्याने राज-अमृत त्या सर्वांचा राग मनात ठेवून होते. त्यामुळे ते सहया करणे शक्यच नव्हते. याचा अर्थ त्यांच्या आणि त्यांच्या बहिणींच्या, आणि कै गोपाळ जाधव यांच्या खोट्या सहया करून गिरणी घराच्या दस्तावर फेरफार केले गेले!
शिवाय राजू त्यावेळी लहान असला तरी तरबेज होता. तो डोळे झाकून सही करणाऱ्यापैकी नव्हता. घनशाम गावडेने "गिरणीला मोटर घ्यायची आहे" म्हणून माझ्या वडिलांकडून सही घेऊन गिरणीचं घरच नावावर करून घेतलं. योगायोगाने मीही तिथे होतो, पण मी काही ते पेपर वाचले नाहीत. जर घनशाम गावडेने नोंदवले आहे, त्यानुसार जाधव कुटुंब 1955 सालीच वेगळे झाले आहे, तर 1995 साली त्याला माझ्या वडिलांच्या सहीची काय आवश्यकता वाटली? हाही एकत्र कुटुंबाचा एक पुरावा आहे.
Maharashtra Farmers Against Corruption - Chandgad, Kolhapur, Maharashtra, India