लोकहितवादींची शतपत्रे
लोकहितवादींची शतपत्रे
संपादक - डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, एम.ए., पी.एचडी
संपादक - डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, एम.ए., पी.एचडी
लोकहितवादी कै. गोपाळ हरी देशमुख
लोकहितवादी कै. गोपाळ हरी देशमुख
(इ. स. १८२३ - १८९२)
(इ. स. १८२३ - १८९२)
लोकहितवादी तथा श्री. गोपाळ हरी देशमुख हे १९ व्या शतकातील एक थोर समाजसुधारक, तत्त्वज्ञ व लेखक. त्यांचे विचार आजही अतिशय क्रांतिकारक व अत्याधुनिक वाटतील असे आहेत. समाजसुधारणेचा त्यांनी महाराष्ट्रात पाया घातला असे म्हणण्यास हरकत नाही. परंतु ते कार्यकर्ते समाजसुधारक नव्हते आणि प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या तत्त्वांप्रमाणे आचरण करण्याचे धैर्य न दाखविल्यामुळे त्यांच्या लेखनकार्यासही म्हणावी तशी प्रतिष्ठा मिळाली नाही. मराठीतील आद्य निबंधकार म्हणूनही त्यांना मान मिळाला नाही, त्याचे एक कारण म्हणजे त्यांचे लेखन अत्यंत विस्कळित असून त्यात सुसूत्रता नाही. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी विविध पत्रे लिहिली आहेत, त्यांची विषयवार एकत्र मांडणी करून त्यांचे समालोचन करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी केले आहे. त्यात त्यांचे संपादनकौशल्य तर दिसून येतेच, पण त्यामुळे शतपत्रांचा अभ्यास करणार्यांनाही त्यामुळे खूप मदत होईल अशी आम्हास खात्री वाटते.
लोकहितवादी तथा श्री. गोपाळ हरी देशमुख हे १९ व्या शतकातील एक थोर समाजसुधारक, तत्त्वज्ञ व लेखक. त्यांचे विचार आजही अतिशय क्रांतिकारक व अत्याधुनिक वाटतील असे आहेत. समाजसुधारणेचा त्यांनी महाराष्ट्रात पाया घातला असे म्हणण्यास हरकत नाही. परंतु ते कार्यकर्ते समाजसुधारक नव्हते आणि प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या तत्त्वांप्रमाणे आचरण करण्याचे धैर्य न दाखविल्यामुळे त्यांच्या लेखनकार्यासही म्हणावी तशी प्रतिष्ठा मिळाली नाही. मराठीतील आद्य निबंधकार म्हणूनही त्यांना मान मिळाला नाही, त्याचे एक कारण म्हणजे त्यांचे लेखन अत्यंत विस्कळित असून त्यात सुसूत्रता नाही. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी विविध पत्रे लिहिली आहेत, त्यांची विषयवार एकत्र मांडणी करून त्यांचे समालोचन करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी केले आहे. त्यात त्यांचे संपादनकौशल्य तर दिसून येतेच, पण त्यामुळे शतपत्रांचा अभ्यास करणार्यांनाही त्यामुळे खूप मदत होईल अशी आम्हास खात्री वाटते.
‘महाराष्ट्र संस्कृती’ या ग्रंथात डॉक्टरांनी महाराष्ट्रीय संतांच्या व समर्थ रामदास स्वामींच्या कार्याचे विवेचन केले आहे. समर्थांचे लेखनही असेच खूप विस्कळित आहेत. त्यातील तत्त्वांची, विचारांची सूत्रबद्ध रचना डॉक्टरांनी इतकी उत्कृष्ट मांडली आहे की, एका टीकाकाराने काहीशा विनोदाने म्हटले होते की, खुद्द समर्थांनाही आपले विचार इतक्या व्यवस्थितपणे मांडता आलेले नाहीत! लोकहितवादींच्या विचारांचे संकलनही डॉक्टरांनी तितक्याच कौशल्याने या पुस्तकाच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत केले आहे, ते विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल अशी खात्री वाटते.
‘महाराष्ट्र संस्कृती’ या ग्रंथात डॉक्टरांनी महाराष्ट्रीय संतांच्या व समर्थ रामदास स्वामींच्या कार्याचे विवेचन केले आहे. समर्थांचे लेखनही असेच खूप विस्कळित आहेत. त्यातील तत्त्वांची, विचारांची सूत्रबद्ध रचना डॉक्टरांनी इतकी उत्कृष्ट मांडली आहे की, एका टीकाकाराने काहीशा विनोदाने म्हटले होते की, खुद्द समर्थांनाही आपले विचार इतक्या व्यवस्थितपणे मांडता आलेले नाहीत! लोकहितवादींच्या विचारांचे संकलनही डॉक्टरांनी तितक्याच कौशल्याने या पुस्तकाच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत केले आहे, ते विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल अशी खात्री वाटते.
येथे या पुस्तकाची प्रस्तावनाच फक्त दिली आहे. कारण तीत लोकहितवादींचे संपूर्ण विचारधन आपणास पाहावयास मिळते.
येथे या पुस्तकाची प्रस्तावनाच फक्त दिली आहे. कारण तीत लोकहितवादींचे संपूर्ण विचारधन आपणास पाहावयास मिळते.