Lord Dattatreya Upasana, Spiritual Ubuntu, Six chakra purification, kriya Yog, Naamsmaran, Parayan upasana, Pitrudosh solutions, All Tratak Upasana. Subscribe to Quick Email lists for Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top.

घरातुन व्यक्ती पळुन गेल्यास...

अनेक वेळा आपला मुलगा अगर अन्य नातलग काही कारणाने घरातुन निघुन जातात. अशा प्रसंगी मनस्वी दुःख व प्रचंड पीडा होते. मुलगा अथवा संबंधित व्यक्ती सुखरुप आहे का ? कोणत्याही परिस्थितीत असेल ? असे असंख्य विचार मनात येतात. त्यायोगे लोक ढोंगी बाबांच्या नादी सुद्धा लागतात.

काही ठिकाणी " हरवला आहे " अशी जाहीरात देऊन बेपत्ता माणसाची बातमी पसरवतात.

यावर एक तोडगा देतो.

ज्या वारी व्यक्ती घरातुन निघुन गेलाय त्याच दिवशी हा तोडगा करावा. घरात कोळ्याचे जाळे अगर पांढरी कातीण कोठेतरी असतेच. हे जाळे काडीने गुंडाळुन घेऊन ते कातिणीत ठेवुन गुंडाळावे व या वस्तु एका शुभ्र कागदात ठेऊन त्याची पुड करावी. ही पुड हातात घेऊन डोळे मिटुन घ्यावेत व खालीलप्रमाणे मंत्र १०८ वेळा जपावा...


त्रातारं त्वां तनूनां हवामहे


नंतर एक हातभर काळे रेशीम आणुन त्या पुडीस गुंडाळावे. त्या पुडीची पुजा वगैरे विधी करू नये.संध्याकाळी ती पुडी पळुन गेलेली व्यक्ती ज्या ठिकाणी झोपत होती त्या ठिकाणी पुरावी. घर माळा असल्यास अथवा घराला फरशी असल्यास त्या ठिकाणी पुड ठेऊन वाटी उपडी ठेवावी. व्यक्ती परत येई पर्यंत त्याच्या घरातील नातलगांनी केळी व पडवळीची भाजी खाणे व्यर्ज आहे.

रोज रात्री पुडीच्या जागी तीन वेलदोडे वाटीवर वाहावेत. हि उपासना सुरु करताच घराबाहेर गेलेल्या व्यक्तीच्या मनात घरी परातण्याचे बलवान विचार येण्यास सुरवात होते. काही दिवसातच व्यक्ती घरी परत येते.

ती व्यक्ती परत घरी आल्यावर .. त्या जागेला गोड नैवेद्य दाखवावा. आत्महत्या झालेल्या व्यक्तींवर उपाय चालणार नाही. एक उदा. देतो. समजा मुलगा बुधवारी गेला असल्यास पुढिल बुधवारी उपाय करावा. तोडग्यात कोळ्याच्या जाळ्याची अतीद्रिंय शक्ती महत्वाची आहे. जाळे ताजे असल्यास अतिउत्तम .