कागदपत्रांची माहिती करीता ९४०४००२६८० नंबर वर व्हाट्सअप करा / For document information, call WhatsApp on 9404002680
केंद्र सरकारनं दहाव्या हप्त्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केलेली नव्हती. त्यामुळे ई-केवायसी केलेली नसतानाही दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.
पण, आता पीएम किसान योजनेअंतर्गत इथून पुढचे म्हणजेच मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे.
त्यामुळे मार्च 2022 पासून पुढचे हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला त्याआधी ई-केवायसी करून घेणं गरजेचं आहे.
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता, अशापद्धतीनं 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
साधारणपणे, दरवर्षी एप्रिल महिन्यात पहिला, ऑगस्टमध्ये दुसरा तर डिसेंबरमध्ये तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.
यंदा मात्र तिसरा हप्ता जानेवारी 2022 मध्ये शेतकऱ्यांना देण्यात आला.
पण, आता या योजनेशी संबंधित एक नवीन बदल समोर आला आहे. तो म्हणजे पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला e-KYC करणं अनिवार्य आहे.
eKYC म्हणजेच Electronic Know your Client. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची ओळख पडताळून पाहिली जाते.
पीएम किसान योजनेसाठी eKYC करण्यासाठी पत्ता - डिजिटल सेवा केंद्र, कर्मवीर चौक, कोर्ट रोड ता- श्रीरामपूर ४१३७०९ मो. ९४०४००२६८०
1) आधार कार्ड (लाभार्थी )
2) आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक
(आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नसल्यास लिंक करून मिळेल
त्यासाठी संबधित लाभार्थी आधार कार्डसह खाली पत्त्यावर समक्ष उपस्थित असणे आवश्यक
पत्ता - डिजिटल सेवा केंद्र, कर्मवीर चौक, कोर्ट रोड ता- श्रीरामपूर ४१३७०९ मो. ९४०४००२६८० )
किंवा
Biometric साठी लाभार्थी कार्यालयात उपस्थित असणे आव्यश्यक
(सध्या टेक्निकल समस्या मुळे Biometric KYC प्रक्रिया बंद आहे )